Posts

मनुस्मृती दहन : स्वातंत्र्याचा अविरत लढा | किरण

मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. ‘मनुस्मृती’ जाळण्याचे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ३ फेब्रुवारी १९२८च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकातही दिलेले आहे. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात – “आम्ही जे ‘मनुस्मृती’चे वाचन केले आहे, त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरिता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. १५८ : २) ‘र...

विषाणू

हवा हिंडाळत फिरते घरादारांच्या चेहऱ्यावरुन उपसुन नेते गाडल्या गेलेल्या प्रश्नांना डोळ्यांतुन वस्त्या रस्त्यांवर शिंपडले गेलेले देहांचे सडे आरसे होऊन चमकवतात समानतेचे शिंतोडे एकच भाषा कळते आता माणसांच्या कळपांना  भीतीचे सोहळे पोटाच्या तव्यावर भुक म्हणुन नाचवतांना अंतर ठेऊन बसलेले माणुस नावाचे कोळि विणताय आता तात्पुरत्या सहजीवनांची जाळी पण अजुनहि ठणठणीत निजल्यात जातींच्या बुरश्या ऋतु हा संपल्यावर पुन्हा घोकतील झेंड्यांच्या भाषा एक विषाणु घुसळुन टाकतो साचलेल्या हव्यासाला खिडक्यांच्या तुरुंगातले कैदि तडफडतात स्पर्शाला बोथटलेल्या अस्तित्वाला नवी धार पाजळतील काय ईथले थडगे नव्या श्वासांचे गीतसार गाजवतील काय

मार्क्स बाबा - Karl Marx

"धर्म हि अफुची गोळि आहे" हे जगप्रसिद्ध वाक्य जेव्हा ऐकल तेव्हा तुझ्याकडे अक्षरश: ओढला गेलो होतो. कॉ.भगतसिंगची नास्तिकता माझ्यात रुजवायला जे खतपाणी होत ते तुझ्याकडुन तर झिरपल होत.जगात सर्वात टोकाच प्रेम आणि तितकाच द्वेष मिळवणारा विचारवंत शेकडो वर्षांनंतर देखील तितकाच किंबहुना टिचभर जास्तच संलग्न वाटतो.तुला भेटण्याचा प्रवास जरा उलट झाला.कॉम्रेड भगतसिंगचा अभ्यास करतांना त्याचा आदर्श लेनिन भेटला लेनिनच्या अभ्यासात त्याचा गुरु म्हणुन तु भेटलास.मग नंतर चे गव्हेरा,हो चि मिन्ह, फिडेल कॅस्ट्रो,डॉ.आंबेडकर ते अण्णाभाऊ साठे,अमर शेख,कॉ. डांगे,नारायण सुर्वे,कुरुंदकर,सुरेश भट, ढसाळ,राज कपुर,बलराज साहनी आणि अशी कितीतरी मोठि लिस्ट देता येईल ज्यांनी प्रेरणा घेतली किंवा अभ्यास केला तुझ्या क्रांतिकारी विचारांचा. 'एंगेल्स' सारखा परममित्र हिमालयाची सावली होऊन मरेपर्यंत सोबत राहिला.'जेनी'सारखी जोडीदार आयुष्यातल्या भल्या मोठ्या वादळवाऱ्यात खंबीरपणे सोबत राहिली. उच्च कोटिचे दारिद्र्य,महाभयंकर व्याधी आणि एकावर एक पुत्रशोक तरी तुझा मुक्काम आयुष्यभर वाचनालयात आणि आंदोलनात. शोषितांच्या ...

प्रेमाचे मलंग रस्ते

"तुला आठवतय का रे? मी तुला विचारलं होत, हे रस्ते कुठे संपतात?" एसटि बसच्या खडखडणाऱ्या खिडकिच्या सुरात सुर मिसळत धावणाऱ्या रस्त्यावर नजर स्थिर करत तिने त्याला विचारलं. "हुम...

धुराडे कुजकट समिधेचे

आता शेवटचा हा क्रम नीट बघत रहा तु... पहिले हि लढाई आतंकवाद विरूध्द भारत असेल.. मग हि लढाई भारत विरूध्द  काश्मिर होईल.. मग काश्मिरी विरूध्द हिंदु होईल... मग हिंदु विरूध्द मुस्लि...

वफाईं मेरी शानदार निकली

कोई शिकवा नहिं तुमसे महरुमी मेरी वफादार निकली... तेरी फितरत थी बेवफाई... वफाई मेरी शानदार निकली... किस शिद्द्त से तुने ये जखम दिए... हर दवा हर दुवा बेअसरदार निकली... तुने समझा कि ये आ...

गुलाब

प्रेम तिच्या डोळ्यात दुर दुर पर्यंत दिसत नव्हत... तरीच म्हंटल इतक जपुन पेरलेल गुलाब दिवसंदिवस का सुकत होत... शब्दात तिच्या दुर दुर पर्यंत माधुर्य नव्हत... तरीच म्हंटल सुकला ग...